Monday, August 8, 2011

श्रावण


पाउस पडू लागला की ..
मन माझे गाउ लागते ..
पडनार्‍या प्रत्येक सरी बरोबर..
आठवण तुझी येऊ लागते...

तू तिथे.. मी इथे..
एकाकी खोल डोहा सारखे..
कसलेच संबंध नसलेल्या..
विरक्ति अन् मोहा सारखे..

तू नि मी एकत्र यावे..
असे आजकाल काही घडत नाही..
आपण सोबत नाही म्हणून ..
मी ही आता रडत नाही..

एकदा जडलेले मन ..
पुन्हा कुठे जडत नाही...
पाउस ही शहाना झालाय...
..
पहिल्या सारखा पडत नाही...


    by amar J

No comments:

Post a Comment

kindly leave a comment... and i will remember you for lifetime.!!!