Monday, September 3, 2012

प्रेम.. कधीतरी..

कधी असे तू रम्य सकाळी.. माझया स्वप्णी येऊन जावे..

माझे जगणे धुकाटलेले .. शांत मनोहर निर्मळ व्हावे..




चुकार थेंब ते केसांवरचे.. इंद्रधनूचे रंग बनावे..


काजळ तुझ्या डोळ्यांमधले .. मेघासारखे बरसून जावे..




चिंब भिजावे आपण दोघे.. हातामध्ये हात असावे..


तुझे नि माझे प्रेम तराने .. वार्‍या नेही गात राहावे...




thanks to Vrushali and Harshal

Monday, August 8, 2011

श्रावण


पाउस पडू लागला की ..
मन माझे गाउ लागते ..
पडनार्‍या प्रत्येक सरी बरोबर..
आठवण तुझी येऊ लागते...

तू तिथे.. मी इथे..
एकाकी खोल डोहा सारखे..
कसलेच संबंध नसलेल्या..
विरक्ति अन् मोहा सारखे..

तू नि मी एकत्र यावे..
असे आजकाल काही घडत नाही..
आपण सोबत नाही म्हणून ..
मी ही आता रडत नाही..

एकदा जडलेले मन ..
पुन्हा कुठे जडत नाही...
पाउस ही शहाना झालाय...
..
पहिल्या सारखा पडत नाही...


    by amar J

Monday, July 4, 2011

A new reason to smile... ROTARACT

have u ever distributed saplings in your life on a sunday...?
spread smiles on someones face..?
Have u been commented by someone that u r on right path, good going..?
this all has been in my life .. since past some days .. since i have joined a group of enthusiastic people.. those having a vision and will to do some good work.. to help somebody .. to make this earth a better to live..


actually i knew dinno from past nearly two years.. a B.E. in IT and MBA in HR, this guy has good sense of what it is called as social service.. When , for my medical training,i shifted to latur and met him personally i come to know about rotaract and its work.. though dinno knew me personally.. he never tried to pull me in his group..
i always thought aboput rotaract remained curious..

finally i joined it.. and worked as a member for a month..
today i am amused to see the immense potential hidden in all this guys...
to collabrate and work to achieve their goals.
to gather and think over qa social problem....
their amusing zeal to achieve professional excellance and social service  togather...
its my pleasure to work with all of these...
and i know i am going to remember this all for my lifetime...

Monday, April 18, 2011

जन लोकपाल विधेयक ... नक्की आहे तरी काय..

सगळीकडे सुरू असलेला गोंधळ पाहिला की असे वाटते की जणूकाही देशात क्रांती ची वेळ आली आहे. जन्तर मंतर वर रोज जमणारी गर्दी पाहून अण्णा हजारेंची नवी फॅन फॉलोयिंग लक्षात येते ... आणि खास हसू येते ते कोण अण्णा आणि लोकपाल म्हणजे काय हे न समजून घेता हातात मेणबत्त्या घेऊन बाहेर पडणार्या सामान्य माणसाचे ...
जन लोकपाल (public ambudsmen) ही काही नवीन संकल्पना नाहीए.. १९४६ पासून ही मागणी पडून होती..
जन लोकपाल ही अशी व्यवस्था आहे की ज्यात सर्वा सामान्य माणसाला देशाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेल्या भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठावता येईल...
जन लोकपाल हा निवृत्त न्यायमूर्ती (सर्वोच्च न्यायालयाचा) असावा ही सिफारिश आहे.. अथवा असा व्यक्ती जो सरन्यायाधीश होण्यास योग्य असेन ... (या "अथवा" मुळे देशातले कित्येक राजकारणी या पदा चे दावेदार होऊ शकतात) .
लोकापालाच्या काम काजा मधे त्याने चौकशी करणे अपेक्षित आहे पण त्यासाठी कोणती यंत्रणा वापरावी हे स्पष्ट नाही..
शिवाय अण्णा स्वतः ही वादाच्या जंजालात सापडलेले आहेत .. रामदेव बाबा आणि अण्णा मधे उडालेल्या चकमकी सुद्धा लक्षात आहेत लोकांच्या ...
अण्णानि नेमलेल्या समिती मधले लोक सुद्धा निर्दोष नाहीयेत... (भूषण पिता पुत्र)
अण्णा चे आंदोलन कॉंग्रेस नेच सोडलेले पिल्लू आहे असाही मानण्यासारखे पुरावे आहेत..
असा असताना उगाच अण्णा ना गांधी ठरवणे आणि देशात क्रांती आल्याचे वातावरण तयार करणे चुकीचेच नाही का...
विचार करा.. आणि रिप्लाय सुद्धा...

Monday, January 24, 2011

पिज्जा .. महासत्ता .. आणि धोबिघाट

बर्‍याच दिवसानंतर पिक्चर पाहायचा म्हणून काल धोबिघाट ला गेलो होतो..
मोजकेच मित्र होते सोबत..
तसा आर्ट फिल्म पाहण्याचा मझा अनुभव शून्य .. पण तरीही बरा वाटला मला धोबिघाट
पिक्चर बघून झाल्यावर पिझ्झा चापायला गेलेल्या तिघा जणात विषय निघाला तो भारत महासत्ता होईल का, या नेहमीच्या वादाचा ..
नेहमीचा आपला अब्दुल कलाम .. नारायण मूर्ती.. आयटी वगैरे मस्तपैकी बोलून झालं ..
आपलं चित्रपट  जगत कसा वास्तवापासून दूर आहे हेही आम्हाला जाणवलं ..
पण त्या दोघा शहरी मुलांत माझी मतं मात्र भिन्न होत चालली होती...
खरं सांगू..   हे मोठे  मोठे पूल.. रस्ते आणि हे यांत्रिकी करण मला कधीच आवडलं नाही..
माझी विकासाची दृष्टी निगडीत आहे ती.. सामान्य माणसा सोबत... शेतकरी ... मजूर.. यांच्या सोबत....
पोटात पुरेशी भाकर नसताना उन्हा तान्हात काम करणार्‍या गरीबासोबत...
मोठी इमारत उभी करणार्‍या मजुराला रात्र उघड्यावर काढावी लागणार नाही एवढी खात्री असली तरी, माझा भारत महासत्ता झालाय असं मला वाटेल...
विकासाची दिशा कुठे तरी चुकतेय असं वाटतंय .. कारण आपण ज्या इमारती बांधतोय त्याच्या तळाशी गरिबांचे मूलभूत हक्क चिरडले जातायेत...
कुठेतरी संपत्तीची लयलूट चाललीय.. आणि कोणीतरी पैशा पैशा साठी तरस्तोय
पिज्जा अर्धवट उष्टा टाकणार्‍या इंडिया ला भाकरी वाचून उपाशी राहणारा भारत कळेल तरी कसा...?
या वक्यावर आम्ही तिघेही चपापलो ...  कारण सगळी चर्चा तर पिज्जा खात खात च चालली होती ना...
अस्वस्थ.. आम्ही तिघेही.. निमुट पणे निघालो..

खरच.. गरिबांची दु:ख गूगल करून कळत नाहीत ....

काही बाही..

राहू देणा राणी अगं...
थोडाफार ओलावाही..
आता पुन्हा तुझी माझी..
पावसात भेट नाही...


झुलु देत हिंदोळ्यावर...
तुझे माझे वेडे मन...
मिलनाचे ओले क्षण
आता पुन्हा येत नाही...


वेचून घे तूच तुझे...
आठवांचे कवडसे..
मन आता वेडेपिसे..
काही केल्या होत नाही...


राहू देना राणी अगं....

                                                                                                            (कविता बिविता)

Friday, January 21, 2011

असंच काही बाही ...

जे दु:ख आठवावे , विसरून आज झाले ....
माझ्या मनी सुखाची चाहूल का मिळेना ...

तो देश वाळवंटी सोडून आज आलो...
माझया मनातला हा वैशाख का सरेना ...

होते गुलाब काही... माझ्या मनी उमलले ..
काटे च का रुतावे ..
तो गंध का मिळेना....

या शब्द - भावनांचा .. मी खेळ खेळणारा ...
व्हावे असे कसे की....
काही मला कळेना...

                                                                                                                   (कविता बिविता)